‘मन की बात…’ लवकरच रंगभुमीवर !

Marathi Playअसे म्हटले जाते कि. अति प्रेम हे संशयास कारणीभूत होऊ शकते. नवरा बायकोच्या नात्यात जर पुरेसा संवाद आणि एकमेकांवराचा विश्वास नसेल तर नको त्या संशयामुळे नात्यात अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. आगामी   ‘मन की बात’ ह्या नाटकातून संशयी पुरूषाच्या मनातली कुजबुज ऐकण्याची आपल्याला संधी मिळणार आहे.  हे नाटक रामायणावर पूर्णपणे आधारीत नसलं तरी नाटकाचं सूत्र मात्र रामायणातल्या अग्निपरीक्षा ह्या घटनेभोवती फिरत रहातं. पुराणकाळापासून आपली पत्नी पवित्र असावी अशी भावना नवऱ्याच्या  मनात असतेच…आणि हे नाटक पण ह्याच भावनेवर आधारीत आहे. रामायणात ज्याप्रमाणे कुणाच्यातरी सांगण्यावरून रामाला सीतेची अग्निपरीक्षा घ्यावी वाटली तशीच घटना जर आज पुन्हा घडली तर काय काय होऊ शकेल?? हे आपल्याला नाटकात पहायला मिळतं. हे नाटक आजच्या काळात घडत असल्यामुळे नाटकावर सध्याच्या सोशल मिडीयाचा आणि रिअँलिटी शोज चा प्रभाव आहे. प्रतीक कोल्हे लिखित आणि दिग्दर्शित ह्या नाटकाची निर्मिती संतोष कोल्हे यांच्या लॉजिकल थिंकर्स आणी संवर्धनफौन्डेशन या संस्थांनी केली आहे.

“मन की बात” च्या निमित्ताने प्रतीक कोल्हे  पहिल्यादाच लेखक दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहेत. याआधी त्यांनी हिंदी, मराठी मालिकांचे, चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे तसेच काही मराठी मालिकांची निर्मितीही त्यांनी केली आहे.

“मन की बात” या नाटकात प्रमुख भूमिकेत अक्षय शिंपी,केतकी विलास,पूर्णानंद,नम्रता सुळे,जयेश शेवलकर आणि आनंद प्रभू हे कलाकार आहेत. नाटकाचे संगीत ऋत्विक गौतमी शंकर याचे आहे तर नेपथ्य स्वप्नील टकले यांनी केले आहे.नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी सिद्धेश दळवी सांभाळत आहेत. हे नाटक परिणामकारक करण्यासाठी दिग्दर्शकाने वेगवेगळ्या खेळांचा आणि नृत्याचा वापर केला आहे ज्यामुळे हे नाटक प्रेक्षकांचं फक्त मनोरंजन करणार नाही तर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर एक वेगळा ठसा उमटवेल. लवकरच हे नाटक रंगभूमीवर दाखल होणार असून निर्मात्यांच्या मते  ह्या वेगळ्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिलेले असे सांगितले जातेय.

Leave a Reply