‘बापमाणूस’ मालिकेला प्रेक्षकांची पसंती.

Suyash Tilak And Shruti Atre Marathi Serial Baapmanus
Suyash Tilak And Shruti Atre Marathi Serial ‘Baap Manus’

बापमाणूस‘ या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली आहे. घरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठी चाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. ‘बापमाणूस‘ मालिकेने नुकताच २०० भागांचा यशस्वी टप्पा गाठला. नुकतेच प्रेक्षकांनी मालिकेत पहिले कि दादासाहेबांच्या जागेवर विराजमान होत आईसाहेबांना आता सर्व सूत्र स्वतःच्या हाती घेतली आहेत .

सध्या ‘बापमाणूस‘ मालिकेत एक अनोखे वळण प्रेक्षकांनी पहिले. शालू चा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आल्यानंतर शब्बीर आणि गीताला सन्मानाने वाड्यात आणल जाते. गीता त्यासाठी सूर्याचे आभार मानते. गीता वाड्यात नसताना घर किती सुनं वाटायचं आणि तिची खूप आठवण येत असल्याची कबुली सूर्या गीताला देतो. पण आईसाहेब हे ऐकतात आणि सगळ्यांसमोर सूर्या आणि गीताच्या लग्नाची घोषणा करतात . रमाकांत ला आईसाहेबांनि परस्पर घेतलेला निर्णय आवडत नाही आणि म्हणून तो आईसाहेबांना हे लग्न करू नका असे मानवण्याचा प्रयत्न करतो . वाड्यात सूर्या आणि गीताच्या लग्नाची तयारी सुरु होते. गीताला मेहंदी लावायच्या क्षणी आईसाहेब भावुक होतात आणि खोलीत दादासाहेबांच्या जुन्या वस्तू काढून बसतात तिथे येते आणि त्यांना सांभाळते . गीताला दादासाहेबांची डायरी सापडते ती वाचते दोघी भावुक होतात . आमचा निशावर संशय आहे हे लिहिलेलं पान वाचायचं राहत .