कसा असेल शिवा – सिद्धीचा लग्नानंतरचा प्रवास?

लग्नानंतर मुलीचे संपूर्ण आयुष्यचं बदलून जाते. सिद्धी आणि शिवाचं नातं अगदी विरोधात आहे .. ज्यामध्ये लग्न होण्याआधीपासून फक्त तिरस्कार, द्वेष आहे… आत्याबाईंनी या दोघांचं लग्न त्यांच्या स्वार्थापोटी लावून दिलं खरं पण या दोघांचं भविष्य काय आहे ? हा तिरस्कार त्यांच्या नात्याला कुठे घेऊन जाईल ? आता शिवाच्या घरचे त्यांना ज्योतिबाच्या दर्शनाला घेऊन जाणार आहेत. हा विधी एका नव्या नात्याची सुरुवात करून देणारा क्षण ठरणार आहे हे नक्की !

Marathi serial 'Jiv Zala Yeda Pisa'
Marathi serial ‘Jiv Zala Yeda Pisa’

शिवा आणि सिद्धीच्या लग्नात बरेच विघ्न आले आणि दोघांच्या मनाविरुध्द हे लग्न झाले… दोघांनाही या लग्न बंधनामधून सुटका हवी आहे… हे दोघेही ज्योतिबाच्या दर्शनास जायला तयार झाले आहेत पण, ह्या प्रथेनुसार नवऱ्याने बायकोला उचलून पायऱ्या चढायच्या असतात… आता दोघांनाही हा विधी करण कठीण जाणार आहे… ‘जीव झाला येडापिसा‘ मालिकेमध्ये पुढे काय होईल ? कसा असेल शिवा – सिद्धीचा लग्नानंतरचा प्रवास ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा  ‘जीव झाला येडापिसा‘ मालिकेचा विशेष भाग या आठवड्यामध्ये रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर.शिवा – सिद्धी ज्योतीबाला काय घालणार साकडं ?