‘वर्तूळ’ या मालिकेत मीनाक्षी आणि अभिजीत चे लग्न

वर्तुळ‘ ही नवी मालिका नावाप्रमाणेच माणसाच्या आयुष्याचं वर्तुळ दर्शवणारी आहे. विकास पाटील, विजय आंदळकर आणि जुई गडकरी यांच्या अभिनयाने सजलेली ही मालिका एक फॅमेली सस्पेन्स स्टोरी आहे. जुई मीनाक्षीची या पात्राची भूमिका साकारत आहे. तर अभिजित परांजपे म्हणजे अभिनेता विकास पाटील हा कथेचा नायक आहे. अभिजित मीनाक्षीला स्वतःच्या घरी घेऊन जातो. कालांतरानें त्या दोघांमध्ये प्रेम होते आणि आता येत्या रविवारी १० फेब्रुवारीला रात्री ९ वाजता ‘वर्तुळ‘ या मालिकेचा महा एपिसोड दाखवला जाणार आहे . यात मीनाक्षी आणि अभिजीत चे लग्न मोठ्या थाटामाटामध्ये घडणार आहे . या लग्नात ‘फुलपाखरू‘ चे कलाकार त्याचप्रमाणे ‘सूर राहू दे‘ चे कलाकार सुद्धा नवजोड्याला शुभेच्छा द्यायला येतील. ‘फुलपाखरू‘ या मालिकेतील मानस या संगीत मध्ये एक सुंदर गाणं गाणार आहे .

 Jui Gadkari and Vikas Patil, Marathi serial 'Vartul'
Vikas Patil and Jui Gadkari, Marathi serial ‘Vartul’

वर्तुळ‘ या मालिकेत तसं पाहता मीनाक्षीने तिच्या भूतकाळातील काही गोष्टी तिच्या मनात दडवून ठेवल्या होत्या मात्र आता तिने तीच आयुष्य मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून अभिजीत ला पाठवले आहे. पण अजूनही अभिजीत ने तो ऑडिओ ऐकला नाही आहे . या लग्नात काही भयंकर घडेल का ? अभिजीत सोबत निर्माण झालेल्या विश्वासाच्या नात्याला मिनाक्षीच्या भूतकाळाने तडा जाणार का? त्यांचं नातं टिकून राहणार का? असे असंख्य प्रश्न सध्या प्रेक्षकांच्या मनात उठत आहेत .